नाईक
देवरस यार्ड
On 23 Jun, 2018 By Administrator 0 Comments
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 साली ‘आणीबाणी’ घोषित केली. सुमारे 19-20 महिने संपूर्ण देशात लोकशाहीविरोधात अनेक अप्रिय घटना घडल्या. सर्व विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांना ‘मिसा’ कायद्याखाली स्थानबद्ध करून तुरुंगात डांबण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालण्यात आली व संघाचे अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांनाही तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्या काळी राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय उपाख्य, बाळासाहेब देवरस यांनाही अटक करून पुणे येथील सुप्रसिद्ध अशा ‘येरवडा जेल’ मध्ये ठेवण्यात आले होते.